दिनांक - ०७/०५/२०२० - स्थलांतरितांचे स्थलांतर
कोरोना महामारीने जगातील अनेक गोष्टी बदलायला घेतल्या आहेत, ही महामारी जितकी दीर्घकाळ चालेल तेवढा ती कायमी परिणाम मानवी जीवनाच्या सर्व - समाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक करणार आहे. अनेक गोष्टी घडत आहेत त्यातलीच एक म्हणजे हंगामी स्थलांतरितांचा प्रश्न, त्यांची सध्या होत असलेली सर्व प्रकारची परवड .....


शहरातील कायमी गरीब रहिवासी संगठीत पणे अधून मधून आवाज उठवतात, त्यांना मतदानाचा हक्क असल्याने त्यांच्या कडे नेत्यांचे, प्रशासकांचे, समाजिक संगठनांचे लक्ष जाते पण हे हंगामी स्थलांतरित अनेक ठिकाणाहून आलेले असल्याने संगठीत नसतात, फक्त चार पैसे कमवून घरी नेण्यासाठी आलेले असल्याने त्यांच्या फार अपेक्षा नसतात, शहरात त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे राजकारणी लोकांसाठी पण हे महत्वाचे नसतात आणि तुम्हा आम्हा सर्व सामन्यांचा ह्यांच्याशी फारसा संबंध नसल्याने आपल्यासाठी पण ते महत्वाचे नसतात अशा प्रकारे हे लोक शहरांमध्ये होते तरी ते अदृश होते सर्वांसाठी, दुर्लक्षित होते सर्वांकडून !!!
सगळ्या शहरांमध्ये एकूण किती आहेत हंगामी स्थलांतरित हे कोणाला कोणाला माहित नाही - अंदाजित आकडा दीड कोटी च्या घरात अत्ता जाणवतो आहे - कदाचित ह्याहून अधिक ही निघेल.

सरकार किंवा शहरी समाजावर इतका अविश्वास ह्यांच्या मनात होता - आहे की सरकार परत जाण्याची काहीच सोय देत नाही हे पाहिल्यावर ह्यांच्या पैकी अनेकांनी हजारो मैलाचा प्रवास सुरु केला आणि त्यामुळे ते आणखी दृश्य झाले, प्रसार माध्यमांचा आवडीचा विषय झाले अर्थातच मग ते आपल्या दिवाणखाण्यातील चर्चेचा विषय झाले आहेत. ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर झालेली ही कविता ....... इतके कष्ट सोसून घरी परत निघालेल्या स्थलांतरितांना अर्पण ......
आरामात घरात बसून टीव्ही पाहताना
शहरांना सोडून
आपल्या घराकडे शेकडो कोस उन्हातानातून
कच्या-बच्याना, म्हाताऱ्या कोताऱ्याना घेऊन
डोक्यावर भंगलेल्या स्वप्नांची, अपेक्षांची गाठोडी
घेऊन
निघालेल्या स्थलांतरितांना
वेडे म्हणू नका, दोष देऊ नका, थांबवू नका .......
तुमच्या पूजनीय नेत्यांनी, सरकारांनी
त्यांच्यासाठी खूप केले हा अंधविश्वास ठेऊ नका
महामारीचा फैलाव वाढवतील ह्या भीतीने
त्यांना कैदेत टाकण्याची मागणी करू नका
सरकारचा आदेश मोडला म्हणून
सध्याच्या रीतीभातीने देशद्रोही ठरवू नका.......
सध्याच्या रीतीभातीने देशद्रोही ठरवू नका.......
अगतिकतेने, भ्रमनिरासतेने पण मुक्त इच्छेने
पाठ फिरवली आहे,
इतके दिवस शहरात अदृश्यपणे
दुर्लक्षित – शोषित आयुष्य जगणाऱ्यानी
ह्या संवेदनहीन, रोगिष्ट शहरांकडे,
शोषण करणाऱ्या मालकांकडे,
निष्क्रिय सरकारकडे, आपणा सर्वांकडे
जाऊ द्या त्यांना, मुक्त होऊ द्या त्यांना........
तुम्हाला जमलेच तर एवढे करा
ह्या सरकारला जागे करा, सुज्ञ करा, माणुसकी शिकवा .......
ह्याच कवितेचा गुजराथी अनुवाद पण केला आहे, तो पण दिला आहे
કવિતા - સ્થળાંતરિતોનું સ્થળાંતર
આરામથી ઘરમાં બેસીને
ટીવ્હી પર જોઇને
શહરોને છોડીને
સેંકડો માઈલના પ્રવાસે પોતાના ઘરને
બળબળતા તાપમાં, કચ્ચ્યા – બચ્ચાઓને, ડોસા-ડોસીને
માથે ભાંગેલા – તૂટેલા શમણાઓ – અપેક્ષાઓના બાચકા લઈને
નીકળેલા સ્થળાંતરીતોને
પાગલ ના માનશો, દોષી ના માનશો, ના રોકશો એમને ......
તમારા પૂજનીય નેતાઓએ, સરકારોએ
ઘણું બધું કર્યું છે આ
લોકોમાટે એવો અંધવિશ્વાસ ના રાખશો
આમાંના ઘરે જવાથી મહામારી વધુ ફેલાશે એવા ડરથી
એમણે જેલમાં નાખવાની
માંગણી ના કરશો
સરકારની વિરુધ્ધ વર્ત્યા તેથી તેઓને
હાલની નવી રીતભાતથી
દેશદ્રોહી ના ઠેરવશો........
અગતીકતાથી, ભ્રમનિરાશાથી પણ મુક્ત ઈચ્છાથી
હવે પીઠ ફેરવી છે અત્યાર સુધી
અદૃશ્યરીતે દુર્લાક્ષિત – શોષિત જીવન જીવનારા લોકોએ
આ સંવેદનહીન, અસમાંવેશક, બીમાર શહેરો તરફ
શોષણ કરતા માલિકો તરફ
નિષ્ક્રિય સરકાર તરફ, આપણા બધા તરફ
જવાદો હવે તેમને, મુક્ત થવા દો તેમને
તમારાથી થાય તો એટલુજ કરજો
આ સરકારને જગાડો, સુજ્ઞ કરો, માનવીય કરો ......