Tuesday 15 August 2017

बेरेहेम आसमा मेरी मंझील बता है कहा

दिनांक - १५ ऑगस्ट, २०१७

ह्या माहितीच्या महाजाळ्याने / समुद्राने आयुष्यच बदलून टाकले आहे - समुद्रात बुडी मारून मोती, रत्ने शोधावी तसे ह्यात शोधत जायचे आणि मग अनेक माहित असलेल्या पण अप्राप्य /असाध्य गोष्टी तर काही वेळेस माहित नसलेल्या गोष्टी अचानक गुप्त धन सापडावे त्याप्रमाणे ह्या माहिती जाळात मिळतात, असेच काहीसे मला आज सापडले .......

तलत महमूद हा माझा अतिशय आवडता गायक आणि त्याच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी खूप आवडणारे गाणे म्हणजे 'बेरेहेम आसमा, मेरी मंझील बता है कहा' ......

बेरेहेम आसमा... मेरी मंझील बता है कहां...

जो न सोचा था वो हो गया
क्यूं नसीबा मेरा सो गया...
गम की ऐसी घटा छा गयी
चैन दिल का कहीं खो गया
ये बता. किसलीये ले रहा है मेरा इम्तेहां
बेरेहेम आसमा...

बुझ गया है ये दिल इस तरह
चांद पिछले पेहेर जिस  तरह...
इतनी तारीकीयो में  ये बता
राह ढूंढे कोई किस तरह
खो गयी मंझिले हो गया गुम काही कारवां
बेरेहेम आसमा...

जा रहे है न जाने किधर
देख सकती नही कुछ नजर
छोड दी नांव मजधार में
किस किनारे लागे क्या खबर...
क्या करें दूर तक रोशनी का नहीं है निशां
बेरेहेम आसमा...


वर्षानुवर्षे हे गाणे ऐकत आलो, गाण्याची ही तीन कडवी तोंड पाठ केलेली पण गाणे नेहमीच थोडे अधुरे वाटायचे, 'मतला' - गझल ला पुरा करणारा शेर असतो तसे ह्या गाण्याला पूर्ण करणारे कडवे आले नाही असे नेहमी वाटायचे.

पूर्वीची अनेक गाणी रेडियो वर अथवा रेकॉर्ड वर अधुरी असतात हे माहित असूनही ह्या बाबतीत शोध कसा काय पण कधी घेतला नाही हे खरे. 'बहाना' नावाच्या १९६० सालच्या चित्रपटातले हे गाणे मदनमोहन यांचे संगीत आणि राजेंद्र क्रिष्ण यांचे शब्द एवढेच कॅसेट वरून माहित होते. अचानक काल हे गाणे यु ट्यूब वर शोधले आणि खजिनाच सापडला - गाण्याची पुढली तीन कडवी सापडली - शब्दांच्या रुपात आणि तलत च्या आवाजात - आणि इतके वर्ष अधुरे जाणवणारे गाणे पूर्ण कळले .....  'बेरेहेम आसमा' हे त्याने कोणाला उद्देशून म्हटले आहे हे कळले..... कळले कसले अंगावर आले, मन, बुद्धी, विचार सारे सारे काही हेलावून टाकले.   आधीच्या तीन कडव्यांसकट आता पुढची तीन कडवी वाचा म्हणजे तुम्हालाही उमजेल मी काय म्हणतो आहे ......

मुझसे किस्मत ने धोखा किया
हर कदम पर नया गम दिया
है खुशीकी कसम के यहां
चैन का सांस तक ना लिया...
बुझ गया, दिल मेरा, रास आया न तेरा जहां...
बेरेहेम आसमा...

तेरी दुनिया में यूं हम जियें
आसूओन्के समंदर पिये...
दिल में शिकवे तडपते रहे
होठ लेकीन हमेशा सीयें
कब तलक, हम रहें, तेरी दुनिया में यूं बेजुबां
बेरेहेम आसमा...

अब कोई भी तमन्ना नहीं
अब यहां हम को जीना नहीं
जिंदगी अब तेरे जाम से
एक कतरा भी पिना नहीं
मौत को भेज के खत्म कर दे मेरी दास्तां
बेरेहेम आसमा...

चौथे कडवे आधीच्या तीन कडव्याप्रमाणे गाणाऱ्याची (नायकाची) अवस्था मांडणारे पण शेवटच्या दोन कडव्यात त्याने 'बेरेहेम' अश्या त्या जगत नियंत्याला जो प्रश्न विचारला आहे, जे सुनावले (ऐकवले) आहे आणि शेवटी जे मागणे मागितले आहे ते म्हणजे वेदनेचा कळस आहे - गाण्यातल्या कल्पनेला / विचारला शिखर पूर्णता देणारे आहे. हे झाले शब्दांचे - ह्या शेवटच्या दोन कडव्यात लागलेला तलत चा आवाज आणि मदन मोहन यांची संगीत रचना शब्दांना नुसती न्याय देणारीच नाही तर घनता देणारी - जिवंत करणारी आहे.

तलत च्या मुलायम, मखमली, किंचित कापऱ्या पण त्यामुळेच अधिक भावपूर्ण आवाजाबद्दल, त्याच्या सहज गाण्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे जे सारे खरे आहे मी अधिक काय लिहिणार. पण तलत ची अशी अनेक दर्दभरी गाणी ऐकताना मला असे जाणवले की ही गाणी आणि तलत चा आवाज हा रेझर ब्लेड / वस्तऱ्याच्या धारेसारखा आहे - ब्लेड ने जसे आधी जराही वेदना न होता बोट अथवा दाढी कापली जाते आणि भळाभळा रक्त सहजपणे वाहू लागते तसे तलत चे गाणे ऐकताना होते.....   मनावर चढवलेली कठीण आवरणे नकळत कापून त्याचा आवाज गाण्याचे शब्द, भाव गाभ्यात पोचवतो ..... मन भळाभळा वहायला स्वतःचीआधीची जखम असायला हवी असे नाही ......त्याचा आवाज वेदनेला शुद्ध, निरपेक्ष, अशरीर रुपात मनाच्या गाभ्यात पोचवतो आणि आपला कॅथार्सिस करतो .......

आणखी काय लिहू तुम्हीच अनुभूती घ्या त्याच्या आवाजाची आणि ह्या गाण्याची .......

https://youtu.be/zv5kb_Tp9QI