दिनांक - १२ /०६/२०२०
कोरोनाने जगभर जे थैमान घातले आणि त्यामुळे जगात होणारे मृत्यू आणि जगात - भारतात जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यात धर्मस्थळे पण बंद करण्यात आली. आधुनिक काळात किमान तुम्हा-आम्हांच्या जीवनात पहिल्यांदाच राजसत्तेने धर्मस्थळे बंद केली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० च्या अंती सुचलेली कविता.
ज्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांना ही कविता कदाचित आवडणार नाही पण 'अस्तित्वात नसणाऱ्या तुला' ह्या शब्दांच्या ऐवजी 'चराचरात असणाऱ्या देवा तुला' हे शब्द घेऊन किंवा देवाचे इतर गुणविशेष घेऊन जरी ही कविता खालील प्रमाणे बदलून लिहिली तरी कवितेतील विचारांचा गाभा - त्यांची यथार्थता बदलणार नाही असे मला वाटते ......
कविता - चराचरात असणाऱ्या देवा
कोरोनाने जगभर जे थैमान घातले आणि त्यामुळे जगात होणारे मृत्यू आणि जगात - भारतात जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यात धर्मस्थळे पण बंद करण्यात आली. आधुनिक काळात किमान तुम्हा-आम्हांच्या जीवनात पहिल्यांदाच राजसत्तेने धर्मस्थळे बंद केली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० च्या अंती सुचलेली कविता.
कविता – अस्तित्वात नसणाऱ्या
देवा
ह्या कोरोना महामारीत
ओस पडली आहेत
तुझी पूजा स्थळे,
प्रार्थना स्थळे
कारण – अकारण तुझ्या
स्थळी धावणाऱ्या
तुझ्यासाठी एकत्र
जमणाऱ्या तुझ्या भक्तांना
थांबवले आहे, रोकले
आहे
तुझा अन त्यांचा मतलबी
उपयोग करणाऱ्या
राज्यसत्तेने
अस्तित्वात नसणाऱ्या
देवा तुला
काय फरक पडणार आहे
म्हणा ..................
संकटात तुझ्या पायी यायचे
तर
तुझ्या स्थळी
येण्यापासून
थांबवले आहे भक्तांना
तुझ्याच स्वघोषित
दलालांनी
तथाकथित साधू, संत, महात्मे, गुरु
पुजाऱ्यांनी
साऱ्या धर्मधुरंधरांनी
धर्मसत्तेने
भक्त जगले तरच तुझे अन
त्यांचे अस्तित्व
असा विचार करून;
अर्थात अस्तित्वात
नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे
म्हणा ..................
जगलेल्या, वाचलेल्या
भक्तांना
देतील तुझे स्वघोषित
प्रेषित ग्वाही
तुझ्या त्यांच्या
वरच्या प्रेमाची
भक्तांचे ह्या
महामारीतून वाचणे
ठरेल तुझ्या
अस्तित्वाची, दायाळूपणाची प्रचीती
पुन्हा उतू जाऊ लागतील
तुझी पूजास्थळे, प्रार्थनास्थळे
अर्थात अस्तित्वात
नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे
म्हणा ..................
ह्या महामारीत लाखो
मेले, लाखो मरतील
तुझ्या नसण्याचे सत्य
सोबत घेऊन
लाखोंचा विश्वास उडेल
तुझ्यावरचा
त्यांची स्वप्नेच
नव्हे, आयुष्ये उध्वस्त होऊन
पण संभाव्यतेच्या
नियमाने घडतील
अशक्य असे चमत्कार,
योगायोग
टिकून राहील त्याने
तुझे अस्तित्व
प्रत्यक्षात नसूनही
कोणाचेही काहीही न
करूनही
अर्थात अस्तित्वात
नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे
म्हणा ..................
तुला मी मानले – न
मानले काय
असे हे सारे लिहिले -
न लिहिले काय
कोणी ते वाचले – न
वाचले काय
काहींनी – साऱ्यांनी
तुला स्वीकारले – नाकारले काय
अस्तित्वात नसणाऱ्या
तुला
काय फरक पडणार आहे
म्हणा ..................
ह्या कोरोना महामारीत
ओस पडली आहेत
तुझी पूजा स्थळे, प्रार्थना स्थळे
कारण – अकारण तुझ्या स्थळी धावणाऱ्या
तुझ्यासाठी एकत्र जमणाऱ्या तुझ्या भक्तांना
थांबवले आहे, रोकले आहे
तुझा अन त्यांचा मतलबी उपयोग करणाऱ्या राज्यसत्तेने
चराचरात असणाऱ्या देवा
तुझे कार्य तू करणारच म्हणा ..................
संकटात तुझ्या पायी यायचे तर
तुझ्या स्थळी येण्यापासून
थांबवले आहे भक्तांना
तुझ्याच स्वघोषित दलालांनी
तथाकथित साधू, संत, महात्मे, गुरु पुजाऱ्यांनी
साऱ्या धर्मधुरंधरांनी धर्मसत्तेने
भक्त जगले तरच तुझे अन त्यांचे अस्तित्व
असा विचार करून;
अर्थात सर्वांचे योगक्षेम पाहणाऱ्या देवा
तुझे कार्य तू करणारच म्हणा ..................
जगलेल्या, वाचलेल्या भक्तांना
देतील तुझे स्वघोषित प्रेषित ग्वाही
तुझ्या त्यांच्या वरच्या प्रेमाची
भक्तांचे ह्या महामारीतून वाचणे
ठरेल तुझ्या अस्तित्वाची, दायाळूपणाची प्रचीती
पुन्हा उतू जाऊ लागतील तुझी पूजास्थळे, प्रार्थनास्थळे
सर्वज्ञ, परम कृपाळू देवा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................
ह्या महामारीत लाखो मेले, लाखो मरतील
तुझ्या नसण्याचे सत्य सोबत घेऊन
लाखोंचा विश्वास उडेल तुझ्यावरचा
त्यांची स्वप्नेच नव्हे, आयुष्ये उध्वस्त होऊन
पण संभाव्यतेच्या नियमाने घडतील
अशक्य असे चमत्कार, योगायोग
लाखो वाचतील, नवे जीवन पामतील
लाखो वाचतील, नवे जीवन पामतील
टिकून राहील लाखोंचा विश्वास तुझ्यावरचा
प्रत्यक्षात असूनही - नसूनही
कोणाचेही करूनही - न करूनही
अर्थात निरपेक्ष अशा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................
भक्त मंदिरी आले – न
आले काय
तुझ्यापाशी आले – न
आले काय
तुला भजिले काय – न भजीले
काय
तुला दान दिले – न दिले
काय
सर्वज्ञ, परम कृपाळू देवा तुला
चराचरात असणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे
म्हणा ...........
तुला मी मानले – न मानले काय
असे हे सारे लिहिले - न लिहिले काय
कोणी ते वाचले – न वाचले काय
काहींनी – साऱ्यांनी तुला स्वीकारले – नाकारले काय
चराचरात असणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................
थोडं पटतंय थोडं नाही.
ReplyDeleteअनिल सारखंच, थोडं हो, थोडं नाही
ReplyDeleteकविता छान मांडली.
हो मला ही दादा थोडं पटलं कारण देव हा आपल्या मानण्यावरंच असतोना.तो आहे की नाही हे सुद्धा अजुम गुढंच आहे.आणि आता हे वाचुन खरंच विचार करावासा वाटतो की त्याला काही फरक पडत असेल??
ReplyDeleteछान आहे ... मी याचे उत्तर आणि apriciation कवितेतून देईन
ReplyDelete