ब्लॉग दिनांक - १३/०१/२०१६ - सरता वर्ष २०१५ - (१)
हा ब्लॉग लिहिण्याचे वर्ष २०१५ संपत आले त्या आधी पासून घोळत होते पण ते काही झाले नाही. २७/१२/२०१५ ते ०४/०१/२०१६ पासून कोकण प्रवासात असल्याने काही लिहिणे शक्य झाले नाही. पण जे सारे विचार मनात वर्ष संपताना आणि ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने घोळत होते त्यांना अनुसरत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवी कविता मात्र झाली ती पण येथे द्यायची राहिली. गेले काही महिने प्रोफेशनल काम काहीच नाही त्यामुळे वेळच वेळ असूनही इतर काहीच कामे मार्गी लागली नाहीत - एक सर्वंकष बेशिस्त, unorganised, unproductive, नोन-क्रिएटीव्ह आयुष्य जगणे चालू आहे त्याचाच एक भाग म्हणजे ब्लॉग लिहिला न जाणे. मनात विचार असूनही, काही कविता लिहिल्या गेल्या तरीही नव्हेंबर नंतर ब्लॉग लिहिणे झालेच नाही .........
वर्ष संपंत आले की सरलेल्या वर्षाविषयी लिहिण्याची एक पद्धत सर्व स्तरावर रूढ झाली आहे त्याला मी ही अपवाद नाही. अगदी लिहिले नाही तरी मनात आपसूक विचार येतात. कालमापनाच्या ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यानुसार एकदा कालखंड संपत आला की मनात विचार येतो की सरलेल्या विशिष्ट कालखंडात काय घडले, सहजच त्या कालखंडाचा आढावा घेतला जातो.... त्यावरून अनेकदा नव्या वर्षासाठी वा कालखंडासाठी अनेकजण संकल्प घेतात पुरे करतात, मोडतात पुन्हा आणखी एक वर्ष वा कालखंड संपतो पुन्हा आढावा असे हे चक्र चालूच रहाते व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय - वैश्विक स्तरापर्यंत. पण या साऱ्यात मजा वा गम्मत ही आहे की निरनिराळ्या पद्धतीने, निरनिराळ्या स्तरावर आपण काळ नामक वस्तू वा परिमाण मोजत असतो, त्याच्या संदर्भात आढावे घेतो, आठवणी जपतो, इतिहास लिहिला जातो विश्लेशीला जातो, त्याला ह्याचे काहीच नसतो, तो हे कालांतराने आपल्यालाच नव्हे संपूर्ण जातीला, समाजाला, राष्ट्राला आणि संस्कृतीला त्याच्या सोबत घेऊन जाऊन सारे पुसून टाकत असतो.
हे सारे कालमापन, त्याचे निरनिराळे खंड, आढावे, विश्लेषण, आठवणीना आठवत राहण्याचा अट्टाहास असे सारे काही जे अंगवळणी पडले आहे, गरजेचे वाटते, महत्वाचे पण आहे एकदम निरर्थक वाटू लागले ...... अशा साऱ्या विचारातून वर्षाच्या शेवटच्या दिवशी जी कविता साकारली ती इथे देत आहे
कविता – कालमापन – लेखन दिनांक -
३१/१२/२०१५ – ०१/०१/२०१६
हा ब्लॉग लिहिण्याचे वर्ष २०१५ संपत आले त्या आधी पासून घोळत होते पण ते काही झाले नाही. २७/१२/२०१५ ते ०४/०१/२०१६ पासून कोकण प्रवासात असल्याने काही लिहिणे शक्य झाले नाही. पण जे सारे विचार मनात वर्ष संपताना आणि ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने घोळत होते त्यांना अनुसरत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवी कविता मात्र झाली ती पण येथे द्यायची राहिली. गेले काही महिने प्रोफेशनल काम काहीच नाही त्यामुळे वेळच वेळ असूनही इतर काहीच कामे मार्गी लागली नाहीत - एक सर्वंकष बेशिस्त, unorganised, unproductive, नोन-क्रिएटीव्ह आयुष्य जगणे चालू आहे त्याचाच एक भाग म्हणजे ब्लॉग लिहिला न जाणे. मनात विचार असूनही, काही कविता लिहिल्या गेल्या तरीही नव्हेंबर नंतर ब्लॉग लिहिणे झालेच नाही .........
वर्ष संपंत आले की सरलेल्या वर्षाविषयी लिहिण्याची एक पद्धत सर्व स्तरावर रूढ झाली आहे त्याला मी ही अपवाद नाही. अगदी लिहिले नाही तरी मनात आपसूक विचार येतात. कालमापनाच्या ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यानुसार एकदा कालखंड संपत आला की मनात विचार येतो की सरलेल्या विशिष्ट कालखंडात काय घडले, सहजच त्या कालखंडाचा आढावा घेतला जातो.... त्यावरून अनेकदा नव्या वर्षासाठी वा कालखंडासाठी अनेकजण संकल्प घेतात पुरे करतात, मोडतात पुन्हा आणखी एक वर्ष वा कालखंड संपतो पुन्हा आढावा असे हे चक्र चालूच रहाते व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय - वैश्विक स्तरापर्यंत. पण या साऱ्यात मजा वा गम्मत ही आहे की निरनिराळ्या पद्धतीने, निरनिराळ्या स्तरावर आपण काळ नामक वस्तू वा परिमाण मोजत असतो, त्याच्या संदर्भात आढावे घेतो, आठवणी जपतो, इतिहास लिहिला जातो विश्लेशीला जातो, त्याला ह्याचे काहीच नसतो, तो हे कालांतराने आपल्यालाच नव्हे संपूर्ण जातीला, समाजाला, राष्ट्राला आणि संस्कृतीला त्याच्या सोबत घेऊन जाऊन सारे पुसून टाकत असतो.
हे सारे कालमापन, त्याचे निरनिराळे खंड, आढावे, विश्लेषण, आठवणीना आठवत राहण्याचा अट्टाहास असे सारे काही जे अंगवळणी पडले आहे, गरजेचे वाटते, महत्वाचे पण आहे एकदम निरर्थक वाटू लागले ...... अशा साऱ्या विचारातून वर्षाच्या शेवटच्या दिवशी जी कविता साकारली ती इथे देत आहे
कविता – कालमापन – लेखन दिनांक -
३१/१२/२०१५ – ०१/०१/२०१६
(सुह्र्दच्या
घरी, कोणार्क नगर, विमान नगर पुणे ३१/१२/२०१५
मध्यरात्र ते ०१/०१/२०१६ दुपार)
ना
आरंभ ना अंत
असा
तू अनादी अनंत
ना
रूप ना आकार
असा
तू निराकार
ना तू
स्थिर ना प्रवाही
मोजण्या
पलीकडलाही
मोजत
राहतो तुला तरीही
अनेक
तोकड्या मोजपट्यांनी आम्ही ||
आजही
अशाच एका मोजपट्टीने मोजला
प्रत्येकाने
आपआपल्या परीने तुला
देऊन
निरर्थक २०१५ संज्ञा त्या कल्पित तुकड्याला
कडू
गोड आठवणी, प्रसंग, घटना गुंडाळल्या
तुला
काहीच नाही रे या साऱ्याचे
मूर्तिमंत
उदाहरण तू निर्विकाराचे
मिटवतोस
तुला मोजणाऱ्याना
सोबत
त्यांच्या साऱ्या संदर्भांना
निरर्थक
जरी तुला कल्पणे, मोजणे, तोडणे
मोजू,
कल्पू तुला पुनःपुन्हा निरर्थकतेने
बांधत
राहू त्यात सरलेले क्षण सवयीने
सांगण्या,
समजण्या, आठवण्या तुझ्या संदर्भाने ||
No comments:
Post a Comment