दिनांक - २४/०१/२०१५
आज ब्लॉगवर ठेवत आहे ती कविता माझी आजी (वडिलांची आई) गेल्यानंतर केलेली. दिनांक ०९/१२/१९९४ ला आजी गेली, तिच्या अंत्यदर्शनाला सुद्धा जाता आले नाही. तिचा सर्वात लाडका असूनही तिच्या शेवटच्या क्षणी मला हजरही राहता आले नाही. अनेक मृत्यू पहिले असले, नवे विज्ञान, जुनी शास्त्रे वाचलेली असली तरी स्वतःच्या प्रिय व्यक्तीचे जाणे अनुभवण्याची पहिलीच वेळ होती माझी कारण आमच्या जोशी कुटुंबात ५२ वर्षांनी मृत्यू घडला होता.......त्या साऱ्या अनुभूतीची ही कविता
कविता
– कारण जीवन उत्सवाचे - मूळ कविता १४/१२/१९९४ मूळ कविता १४/१२/१९९४
आज ब्लॉगवर ठेवत आहे ती कविता माझी आजी (वडिलांची आई) गेल्यानंतर केलेली. दिनांक ०९/१२/१९९४ ला आजी गेली, तिच्या अंत्यदर्शनाला सुद्धा जाता आले नाही. तिचा सर्वात लाडका असूनही तिच्या शेवटच्या क्षणी मला हजरही राहता आले नाही. अनेक मृत्यू पहिले असले, नवे विज्ञान, जुनी शास्त्रे वाचलेली असली तरी स्वतःच्या प्रिय व्यक्तीचे जाणे अनुभवण्याची पहिलीच वेळ होती माझी कारण आमच्या जोशी कुटुंबात ५२ वर्षांनी मृत्यू घडला होता.......त्या साऱ्या अनुभूतीची ही कविता
कविता
– कारण जीवन उत्सवाचे - मूळ कविता १४/१२/१९९४ मूळ कविता १४/१२/१९९४
(मूळ कविता १४/१२/१९९४ दुपारी ४.० ते
४.३० पुनर्लेखन २३/०१/२०१५ संध्याकाळी ५.० ते ६.०)
विचारतायेत सारेच
कारण माझ्या जीवन उत्सवाचे
तेही आजी नुकतीच गेली असतानाचे ||
खरं तर स्वत:शी एकांत साधताच
आजी नसल्याची जीवघेणी जाणीव उठतेच
ती गेलीय न परतीच्या वाटेन
जायचे आपणालाही एक दिवस त्या वाटेन
जाऊनही त्या वाटेवरून
तिची-माझी, आपल्या कोणाचीही एकमेकांशी
भेट होणार नाहीये कधीच
जे काही जगायचे एकमेकांशी
ते इथेच, हे ही जाणवलंय तेंव्हाच ||
ही जाणीवच
कारण माझ्या जीवन उत्सवाचे
आजी नुकतीच गेली असतानाचे ||
No comments:
Post a Comment